भावांजली!!!
कल्याण च्या साहित्य विश्वात अनेक वर्षे कार्यरत असलेले आणि 'काव्य किरण मंडळा'चे अध्यक्ष किरण जोगळेकर यांचे परवा दुःखद निधन झाल्याचे कळाले!
कविता आणि वैचारिक लेखनाची त्यांची जवळपास ७५ पुस्तके प्रकाशित झाली होती. साहित्य संमेलनासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असे!
२००४ मध्ये माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंकास पहिल्यांदा त्यांच्याच 'साहित्य विचार मंथन' संस्थे कडून गौरविण्यात आले. त्यानंतर आमचे संबंध वृद्धिंगत होत गेले!
त्यांस माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
No comments:
Post a Comment