Thursday 17 January 2019

'पिफ्फ' झालाय निरसवाणा!


आतापर्यंत 'पिफ्फ' ला जागतिक चित्रपटाशी बांधिलकी खातिर नि चित्रपटकर्ते-संचालक यांच्याबाबतच्या जिव्हाळ्यामुळे उपस्थित राहत होतो; पण गेल्या काही वर्षांपासून त्यातील रस जाऊ लागलाय. याचे मुख्य कारण म्हणजे त्यातले राजकारण आणि एका-दोघा तथाकथित क्रीएटिव्सवाल्यांची त्यातील मक्तेदारी!

'पिफ्फ' च्या सुरुवातीच्या काळात त्यास प्रोत्साहनपर माझ्या 'चित्रसृष्टी' मध्ये मी बरेच लिहिले; मात्र (काहींच्या त्यातील प्रवेशामुळे) कालांतराने त्यांत (चित्रपट निवडीसह) निर्माण होत गेलेल्या त्रुटींवर मी वारंवार लिहित आलोय. पण त्यांत काही फरक जाणवत नाही; उलट 'तथाकथित चित्रपट तज्ञां'चा मनमानीपणा दिसून येतो. त्यामुळे आता यावर काही लिहू नये वाटते!

'पिफ्फ' राज्य सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव झाला; पण इथे तो काहींचा खाजगी असल्यासारखेच वाटते! त्याची सुत्रे तथाकथित क्रीएटिव्स डायरेक्टर व हेड असणाऱ्यांकडे गेल्याचे जाणवते. चित्रपट निवड समितीत त्यांची वाढती नावे, वार्तालाप व कार्यक्रम यांत त्यांचा वरचष्मा (का मिरवणे) हे दिसून येते!

आता 'पिफ्फ' च्या समारोपास उपस्थित राहू नये वाटते. त्यांतील सत्कार समारंभात क्रीएटिव्स डायरेक्टर स्टेजवर आल्यावर त्या थिएटरमध्ये व्हॉलेंटिअर्स आदी व्यवस्था (अरेरावीने) पाहणारा..मागे बसलेल्या मुलांना टाळ्या वाजवून जल्लोष करायचा इशारा करतो हे निदर्शनास आलेय! हे तथाकथित 'चित्रपट गुरु'ची विद्यार्थीप्रियता भासविण्यासाठी! असे भोंगळ चित्र पाहणे नि ते राजकारण नकोसे झालेय!

इथून पुढे आवश्यक बदल/सुधारणांसह 'पिफ्फ' चांगल्या मुक्त वातावरणात व्हावा ही अपेक्षा!!

- मनोज कुलकर्णी

Monday 7 January 2019

कसली भाषिक अस्मिता..नि कुठेय अभिव्यक्ती?


ज्येष्ठ लेखिका श्रीमती नयनतारा सहगल!
ख्यातनाम लेखिका श्रीमती नयनतारा सहगल यां आगामी '९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे करणार असणारे उद्घाटन अचानक रद्द झाल्याचे कळल्यावर खेद वाटला!

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास अमराठी साहित्यिकांस नापसंती दर्शविणे ही कसली भाषिक अस्मिता? तसेच त्यांचे परखड भाषण गैरसोईचे होईल असे आयोजकांस वाटणे हे अभिव्यक्ति स्वातंत्र्यास तिलांजली देण्यासारखेच!

श्रीमती सहगल या आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भाच्ची असून, इंग्रजीमध्ये त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये त्यांनी वाढत्या असहिष्णुते मुळे तसेच सांस्कृतिक विविधता जपण्याच्या चिंतेतून आपला 'साहित्य अकादमी पुरस्कार' परत केला होता!..ही पार्श्वभूमी इथे लक्षात घ्यावी!

तर ही कसली भाषिक अस्मिता जी दुसऱ्या भाषांचा अनादर करते?..आणि कुठे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य परखडपणे व्यक्त होण्याचे?

अशा गोष्टींचा निषेध!..आशा आहे हे वातावरण बदलेल!!

- मनोज कुलकर्णी
  ['चित्रसृष्टी']