Wednesday 7 October 2020

संस्कृत नंतर उर्दू मध्येच उत्कट प्रेमकाव्य!



चौथ्या शतकातील कालिदास यांस आद्य संस्कृत प्रेमकविच म्हणायला हवे!

'मेघदूतम' मधून नभातील मेघाद्वारे प्रेमिकेस संदेश पाठवणारे तर 'अभिज्ञान शाकुन्तलम्' मध्ये अरण्यातही सुंदर प्रेमकाव्य फुलवणारे!

हे पाहता संस्कृत भाषा उगाच केवळ (उपदेशांच्या) सुभाषितांपुरती मर्यादित आणि प्राचीन रुक्ष चौकटीत बंदिस्त केल्यासारखी वाटते!

कालिदास यांच्या सारखे आद्य संस्कृत कवि इतक्या उच्च प्रतीच्या प्रणयी भावना व्यक्त करतात, इतकी सुंदर रुपके वापरतात हे अचंबित करते! त्याचा प्रभाव मराठी काव्यसंपदेवर फारसा दिसून येत नाही. हिंदीतही बहुतांश अवास्तव लांबण लावल्या सारखे आढळते तर (फारशी साहित्याची नसलेली) इंग्रजी त्यामध्ये फार कमी पड़ते!

त्या तुलनेत उर्दू काव्यात प्रणयी भावना अधिक उत्कटपणे आणि समृद्ध शब्द-भाषा शैलीत व्यक्त झालेली प्रकर्षाने जाणवते! 
(यांत काहींना माझे उर्दू प्रेम दिसून येईल!)

मराठीतील अर्वाचिन प्रेमकाव्ये ही बऱ्याचदा उथळ जाणवतात..आणि नव कवी तर काय उगाच तावच्या ताव भरत बसतात. किती 
आशय असतो त्यांत? 

कमीत कमी शब्दांत नि ओळींत आशयघन भाव उत्कटपणे व्यक्त व्हायला हवा. रुबाई सारख्या कवितेच्या प्रकारांत हे प्रभावीपणे आढळते आणि यांत उर्दू भाषा अव्वल ठरते!

- मनोज कुलकर्णी

No comments:

Post a Comment