Thursday 24 August 2023


"भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी..."


हे तितक्याच भावोत्कटपणे पडद्यावर साकार करणाऱ्या, अभिजात मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखदायीच!


रमेश देव-सीमा देव या दिग्गज कलाकार दांपत्याशी झालेली भेट आज आठवते!!

त्यांस सुमनांजली!!

- मनोज कुलकर्णी

Sunday 6 August 2023

निसर्गकवी ना. धो. महानोर.
"गडद जांभळं भरलं आभाळ..."

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचे निधन झाल्यावर त्यांचे हे काव्य त्यांच्याच आवाजात मनात रुंजी घालू लागले..आणि मन सुन्न झाले!


'रानातल्या कविता', 'गावातल्या गोष्टी', 'पक्ष्यांचे लक्ष थवे' असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.

"चिंब पावसानं रान झालं आबादानी.." सारखी त्यांची चित्रपटगीतेही तो मराठी मातीचा गंध घेऊन आली!

विशेषत्वानं आठवतं ते जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) चित्रपटात स्मिता पाटीलने अप्रतिम साकार केलेलं..
 "नभ उतरू आलं..चिंब थरथर वल्ल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात!'


'अजिंठा' या त्यांच्या खंड्काव्यावर प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटही केला!..तेही नुकतेच हे जग सोडून गेले!

'साहित्य अकादमी' ते 'पद्मश्री' असे मानाचे पुरस्कार महानोर यांना लाभले! 'मराठी साहित्य संमेलना'चे ते अध्यक्षही झाले!

त्यांच्या काव्यवाचनाच्या वेळी त्यांची झालेली भेट आठवते!!

त्यांना भावपूर्ण पुष्पांजली!!

- मनोज कुलकर्णी

Wednesday 2 August 2023

सोयीचे बचावात्मक राजकारण करीत दोन्हीकडे असणारे पाहून 'असून अडचण, नसून खोळंबा!' म्हणीची आठवण झाली!

- मनोज कुलकर्णी