अशी मराठी नाट्य संस्कृती!
'अश्रूंची झाली फुले' हे प्रख्यात
मराठी लेखक वसंत कानेटकर यांनी १९६० च्या दशकात लिहिलेले नाटक प्रभाकर
पणशीकरांनी यशस्वीपणे रंगभूमीवर आणले.
आदर्शवादी प्राध्यापक आणि बिघडलेला विद्यार्थी यांच्या आयुष्यात नियतीने घडवलेले बदल हे याचे कथा सूत्र होते! यांत पणशीकरांनी स्वाभाविकपणे प्रा. विद्यानंद आणि.. काशिनाथ घाणेकर यांनी अफलातूनरित्या विद्यार्थी लाल्या अशा प्रमुख भूमिका रंगवल्या!
अन याचे असंख्य प्रयोग गाजवले पण पणशीकरांच्या संस्थेतील वातावरण बदलले नाही!
अशीच मराठी संस्कृती जपणारी त्यांची ही दुर्मिळ छायाचित्रे..
अशीच मराठी संस्कृती जपणारी त्यांची ही दुर्मिळ छायाचित्रे..
(वरील) नाटककार वसंत कानेटकर यांना खुर्चीवर बसून स्वतः त्यांच्यापाशी खाली बसणारे श्रेष्ठ कलावंत प्रभाकर पणशीकर! आणि..
(बाजूचे) भारतीय बैठक नि ताटांसमोर रांगोळ्या काढलेल्या अशा पंगतीत जेवतांना यांतील चित्तरंजन कोल्हटकर सारखे कलावंत आणि पणशीकर व घाणेकर!..कदाचित पंतांनी "वदनि कवळ घेता.." सुद्धा म्हंटले असेल!
(बाजूचे) भारतीय बैठक नि ताटांसमोर रांगोळ्या काढलेल्या अशा पंगतीत जेवतांना यांतील चित्तरंजन कोल्हटकर सारखे कलावंत आणि पणशीकर व घाणेकर!..कदाचित पंतांनी "वदनि कवळ घेता.." सुद्धा म्हंटले असेल!
आपली नाट्यसृष्टी प्रत्यक्ष अनुभवलेल्या जुन्या लोकांकडून ऐकलेल्या त्या संस्कृतीचं प्रत्यंतर अशा छायाचित्रांनी येते!
- मनोज कुलकर्णी
No comments:
Post a Comment