फक्त 'क्रीडा'चाच विचार..कला-लेखन क्षेत्राबाबत काय?
गेल्या वर्षी दूरदर्शन वरील बातम्यांमध्ये 'आता क्रीडा पत्रकारांना पण राज्य सरकार पुरस्कार देणार' अशा आशयाची बातमी ऐकली होती!
तेंव्हा विचार केला..पूर्वी पासून केवळ क्रीडा क्षेत्राकडेच सरकार दरबारी सवलतींचा ओघ राहत आला आहे..आणि कला-सिनेमा क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे.
मग या क्षेत्रांत समर्पितपणे काम करणाऱ्या कलाकार, लेखक आणि चित्रपटाच्या उन्नतीच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक लेखन-कार्य करणाऱ्या सिने पत्रकारांचे काय?..त्याबाबत काही ठरल्याचे अद्याप ऐकीवात नाही!
ही सार्वत्रिक वा प्रातिनिधीक भावना समजावी!
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)
('चित्रसृष्टी', पुणे)
No comments:
Post a Comment