Wednesday 3 October 2018

'गदिमां'ना मानवंदना!


 - मनोज कुलकर्णी 


जनमानसांत रुजलेले काव्य रचणारे श्रेष्ठ गीतकार व पटकथाकार ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच सुरु झाले!


त्यांस सुमनांजली वाहताना.. गदिमांची मला भावलेली व आजही समकालिन असणारी ही रचना आठवली... 


"..अजब तुझे सरकार!"

लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार..
इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार!
लबाड जोडिती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपडया
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार!
वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार!"


********************************************************

No comments:

Post a Comment