माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Sunday, 21 April 2019
Monday, 15 April 2019
राजसा...श्रृंगार रस..आणि भट!
![]() |
| ग़ज़ल सम्राट..कविवर्य सुरेश भट! |
मराठीत गझल रचना लोकप्रिय करणारे कविवर्य सुरेश भट म्हंटले की..
"जगत मी आलो असा.." नाहीतर "उषःकाल होता होता काळरात्र झाली.!" सारखे वास्तवस्पर्शी काव्य सर्वसाधारणपणे लगेच आठवते!
![]() |
| संगीतकार हृदयनाथ मंगेशकर! |
पण भट यांच्या श्रृंगारिक रचना सुद्धा भावतात..यात मला त्यांच्या अशा दोन रचनांचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो..ज्यात मुख्यत्वे 'राजसा' ला उद्देशून प्रणयाराधना करण्यात आली आहे..
"तरुण आहे रात्र अजुनी 'राजसा' निजलास का रे.?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे.?"
आणि..
"मालवून टाक दीप...चेतवून अंग अंग...
'राजसा' किती दिसात लाभला निवांत संग!"
![]() |
| ख्यातनाम गायिका आशा भोसले आणि लता मंगेशकर! |
दोन्ही गीते हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात (पहिले) आशा भोसले आणि (दुसरे) लता मंगेशकर यांनी भावस्पर्शी गायली आहेत!
आज भट यांची ८७वी जयंती!
त्यांस आदरांजली!!
- मनोज कुलकर्णी
Friday, 12 April 2019
डॉ. विजय देव यांचे निधन!
व्यासंगी प्राध्यापक डॉ. विजय देव यांचे पुण्यात दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले!
ख्यातनाम साहित्यिक श्रीमान गो. नी. दांडेकर यांचे ते जावई आणि लेखिका डॉ. वीणा देव यांचे पति होते; तर सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या त्यांच्या कन्या!
गोनिदांच्या जन्मशताब्दी समारंभात त्यांचे व्याख्यान ऐकल्यावर झालेली त्यांची प्रसन्न भेट मला अजूनही स्मरते!
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली!!
- मनोज कुलकर्णी
Wednesday, 20 March 2019
![]() |
| कवि-गीतकार ग.दि माडगूळकर. |
"या चिमण्यांनो...परत फिरा रे..
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा.."
ग.दि माडगूळकरांचे हे हृद्य गीत अचानक स्मरले..ते आज 'जागतिक चिमणी दिन' असल्याची बातमी पाहून!
(गीतात हे मुलांस उद्देशून आहे!)
चिमण्या दिसणे आजच्या काँक्रीटच्या जंगलात दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्त होत असताना हे गीत समर्पक ठरते! त्याच प्रमाणे कुटुंब-समाज व्यवस्थेबाबतही रूपकात्मक म्हणता येईल!
![]() |
| गायिका लता मंगेशकर. |
श्रीनिवास खळे यांच्या संगीतात हे गीत मोठ्या आर्तपणे गायले होते लता मंगेशकरांनी.. 'जिव्हाळा' (१९६८) या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटासाठी!
योगायोगाने आज गबाले साहेबांचीही जयंती आहे. 'आमचा दोघांचा वाढदिवस २० मार्च
या एकाच तारखेस असल्या'चे मी त्यांना भावुकपणे नमूद केले होते..आणि आमचा हा जिव्हाळा ते जाईपर्यंत राहिला! त्याची आठवण आणि या गीताने आज भरून आले!

माझ्या 'चित्रसृष्टी' प्रथम विशेषांकाच्या प्रकाशन समारंभास राम गबाले अध्यक्ष म्हणून आले.. त्याचे हे (उजवीकडील) मी त्यांचा सत्कार करतानाचे छायाचित्र!
त्यांच्या स्मृतीस अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी
Thursday, 14 March 2019
मराठी ग़ज़लसम्राट सुरेश भट्ट यांचा आज १६ वा स्मृतिदिन!
'रंग माझा वेगळा' ह्या त्यांच्या काव्यसंग्रहातील ही हृदय ग़ज़ल इथे सादर...
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा...
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
त्यांस विनम्र भावांजली!!
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा...
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
त्यांस विनम्र भावांजली!!
सुवर्णमहोत्सवी मराठी चित्रपटांचे सम्राट..दादा कोंडके!
विलक्षण लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपटकर्ते दादा कोंडके यांचा आज २१ वा स्मृतीदिन!
'विच्छा'ने रंगभूमी गाजवून, मग बाबांच्या (भालजी पेंढारकर) 'तांबडी माती' सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर दादा कोंडके यांनी स्वतंत्रपणे मराठी चित्रपटाचा फड गाजवायला १९७० मध्ये सुरवात केली आणि 'सोंगाड्या', 'एकटा जीव सदाशीव' पासून ते 'वाजवू का' अशी ते जाईस्तोवर (१९९८) अफलातून विनोदी चित्रपटांची मालीकाच मराठी प्रेक्षकांपुढे सदर केली आणि त्यांना मनमुराद हसवले !
![]() |
| 'सोंगाड्या' (१९७०) मध्ये दादा कोंडके व उषा चव्हाण! |
भोळाभाबडा मराठी नायक ही दादा कोंडके यांची पडद्यावरील प्रतिमा होती! मात्र त्यांचे द्विअर्थी संवाद नि गाणी हा समीक्षकांचा कायम टीकेचा विषय राहीला..पण ते त्यांच्या प्रचंड प्रेक्षक वर्गास हवे तसे चित्रपट करीत राहिले! आणि सर्वाधिक (९) चित्रपट रौप्यमहोत्सवी झाल्याबद्दल त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये नोंदले गेले !
मराठी चित्रपटसृष्टीतील त्या अर्थाने ते दादाच होते..तसा त्यांचा आविर्भाव अन कमालीचा मिश्कीलपणा आम्ही चित्रपट पत्रकारांनी त्यांच्या गप्पांच्या मेफलीत अनुभवला आहे..हा फड ते एकतर्फीच गाजवीत! त्यांच्या द्विअर्थी टोमण्यातून कुणीही सुटले नव्हते..
अगदी टीकाकार, पत्रकारही नाही!
त्यांना ही भावांजली !!
- मनोज कुलकर्णी
Saturday, 2 March 2019
इसाक मुजावर..भारतीय चित्रपटाचा चालता-बोलता इतिहास!
मराठी चित्रपट पत्रकारितेतील इसाक मुजावर हे शिखरावर असलेले, प्रमाण मानले गेलेले नाव! भारतीय चित्रपटाचा चालता बोलता इतिहास असे त्यांस संबोधले जायचे! १९५५ साली सुरु झालेली त्यांची चित्रपट पत्रकारिता 'तारका', 'रसरंग'चे कार्यकारी संपादक ते स्वतःचे 'चित्रानंद' व नंतर अनेक दैनिके, नियतकालिकांतून फुलत गेली! चित्रपट विषयक लेखनातील त्यांचा शब्द हा शेवटचा मानला जायचा..पुढे त्यांची तीसेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली! चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या लेखनात स्वाभाविकपणे अनौपचारिकपणा असायचा!
अभ्यासपूर्ण चित्रपट विषयक लेखन करणाऱ्या आम्हा चित्रपट पत्रकारांचे इसाक
मुजावर हे एक प्रेरणास्रोत होते! त्यांच्या 'चित्रानंद' मध्ये लेखन होऊ
शकले नाही, कारण मी चित्रपट पत्रकारितेत आलो १९८३ मध्ये..(१९९५ नंतर
'रसरंग' मध्ये लिखाण झाले पण ते तिथे नसताना) पुढे मात्र माझ्या स्वतःच्या
'चित्रसृष्टी' दिवाळी अंकासाठी त्यांचा लेख घेण्याचा योग आला! मला आठवतेय
२००२ च्या आसपास मी मुंबईत कांदिवलीच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना
भेटलो होतो; तेंव्हा मी स्वतःचे चित्रपट विषयक नियतकालिक सुरु केल्याचे
त्यांना कौतुक वाटले!
त्यावेळी त्यांच्याशी झालेला मनमोकळा संवाद आठवतोय. त्या सुमारास भन्साळीचा नवा 'देवदास' प्रदर्शित झाला होता. त्यावर मार्मिक टिपणी करताना ते म्हणाले होते ''करायला गेला 'देवदास' अन झाला 'पाकीझा'!'' आमच्यासाठी दिलीपकुमारचा 'देवदास' हा मानदंड होता! पुढे त्यांच्याशी दिलखुलास गप्पा व्हायच्या आणि आपल्या खास टिपणीवर तेच टाळीसाठी हात पुढे करायचे! 'रागिणी' चित्रपटात नायक किशोरकुमारला मोहम्मद रफींच्या आवाजात "मन मोरा बावरा.." आळवताना पाहिल्याचा विषय निघाला, तेंव्हा ते म्हणाले होते ''आधी ती भूमिका भारत भूषण करणार होता म्हणून रफींच्या आवाजात ते गाणं आधीच रेकॉर्ड झाल होतं!'' असे चित्रपट इतिहासाचे अनेक दाखले त्यांच्याकडे होते..अशोककुमारनी दिलीपकुमारला काय सल्ला दिला..वगैरे. त्यामुळे त्यांची गप्पांची मैफल कधी संपू नये वाटे!
माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंक, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला 'ट्रैजिडी किंग, एंटी हीरो ते एंग्री यंग मैन' हा त्यांचा कदाचित शेवटचा लेख असावा! याबाबतही एक हृद्य आठवण अशी आहे की मी हा विषय त्यांना दिल्यावर त्यांनी 'चित्रसृष्टी' साठी मला लेख तर दिलाच, पण नंतर विस्ताराने त्यावर पुस्तकही लिहिले 'मास्टर विठ्ठल ते अमिताभ' आणि त्याच्या प्रास्ताविक मनोगतात शेवटच्या दोन परिच्छेदांत माझा उल्लेख करून श्रेयही दिले! ते वाचून अक्षरशः भरून आले! मीही 'चित्रसृष्टी'च्या त्या दिवाळी अंकात मला मिळालेल्या त्यांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला!
त्यांचा 'चित्रभूषण' सन्मानाने यथोचित सत्कार झाला होता. तसे त्यांना अन्य संबंधित पुरस्कारही मिळाले!
चित्रपट इतिहासाची ती रसिली मैफल आता पोरकी झालीये!!
त्यांस भावांजली!!!
- मनोज कुलकर्णी
त्यावेळी त्यांच्याशी झालेला मनमोकळा संवाद आठवतोय. त्या सुमारास भन्साळीचा नवा 'देवदास' प्रदर्शित झाला होता. त्यावर मार्मिक टिपणी करताना ते म्हणाले होते ''करायला गेला 'देवदास' अन झाला 'पाकीझा'!'' आमच्यासाठी दिलीपकुमारचा 'देवदास' हा मानदंड होता! पुढे त्यांच्याशी दिलखुलास गप्पा व्हायच्या आणि आपल्या खास टिपणीवर तेच टाळीसाठी हात पुढे करायचे! 'रागिणी' चित्रपटात नायक किशोरकुमारला मोहम्मद रफींच्या आवाजात "मन मोरा बावरा.." आळवताना पाहिल्याचा विषय निघाला, तेंव्हा ते म्हणाले होते ''आधी ती भूमिका भारत भूषण करणार होता म्हणून रफींच्या आवाजात ते गाणं आधीच रेकॉर्ड झाल होतं!'' असे चित्रपट इतिहासाचे अनेक दाखले त्यांच्याकडे होते..अशोककुमारनी दिलीपकुमारला काय सल्ला दिला..वगैरे. त्यामुळे त्यांची गप्पांची मैफल कधी संपू नये वाटे!
माझ्या 'चित्रसृष्टी' दिवाळी अंक, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला 'ट्रैजिडी किंग, एंटी हीरो ते एंग्री यंग मैन' हा त्यांचा कदाचित शेवटचा लेख असावा! याबाबतही एक हृद्य आठवण अशी आहे की मी हा विषय त्यांना दिल्यावर त्यांनी 'चित्रसृष्टी' साठी मला लेख तर दिलाच, पण नंतर विस्ताराने त्यावर पुस्तकही लिहिले 'मास्टर विठ्ठल ते अमिताभ' आणि त्याच्या प्रास्ताविक मनोगतात शेवटच्या दोन परिच्छेदांत माझा उल्लेख करून श्रेयही दिले! ते वाचून अक्षरशः भरून आले! मीही 'चित्रसृष्टी'च्या त्या दिवाळी अंकात मला मिळालेल्या त्यांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला!
त्यांचा 'चित्रभूषण' सन्मानाने यथोचित सत्कार झाला होता. तसे त्यांना अन्य संबंधित पुरस्कारही मिळाले!
चित्रपट इतिहासाची ती रसिली मैफल आता पोरकी झालीये!!
त्यांस भावांजली!!!
- मनोज कुलकर्णी
Monday, 25 February 2019
![]() |
| बहुआयामी व्यक्तिमत्व श्रीधर माडगुळकर! |
'गदिमा साहित्य कला अकादमी' चे ते विश्वस्त तर होतेच; पण पत्रकारिता-साहित्य आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांत भरीव कार्यांने त्यांनी आपली स्वतंत्र ओळखही निर्माण केली होती. मग 'जिप्सी' सारखे त्यांचे युवा मासिक असो वा 'आठी आठी चौसष्ट' सारखे कादंबरी लेखन! तसेच नव्या युगाची चाहुल लागल्यावर 'जाळं' हे इंटरनेट नियतकालिक सुरु करणेही! आणि माडगुळे गावात विकास प्रतिष्ठान द्वारे त्यांनी केलेले समाजकार्य!
![]() |
| आपल्या पुस्तकांसह 'गदिमा' पुत्र श्रीधर माडगुळकर! |
मला आठवते उमेदीच्या काळातील त्यांचा राजकारणातील सहभाग..पूर्वी ते जेंव्हा विधानसभेसाठी 'काँग्रेस' तर्फे उभे होते, तेंव्हा पुण्यात त्यांच्या प्रचारासाठी आशा पारेख सारखे लोकप्रिय सिने कलावंत आले होते. तेंव्हापासून ते नंतर 'गदिमा प्रतिष्ठाना' तर्फे होणाऱ्या कार्यक्रमांतून मी त्यांना पाहत नि भेटत आलो! ते एक कलासक्त, प्रतिष्ठित नि अदबशीर व्यक्तिमत्व होते!
त्यांस माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
- मनोज कुलकर्णी
Thursday, 21 February 2019
'मानिनी'..जयश्री गडकर!
![]() |
| मराठी चित्रतारका जयश्री गडकर यांच्या दोन काळांतील प्रतिमा! |
![]() |
| 'सांगत्ये ऐका' (१९५९) मध्ये जयश्री गडकर व सूर्यकांत! |
![]() |
| 'मानिनी' (१९६१) मध्ये जयश्री गडकर! |
तसे पाहता हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या 'सांगत्ये ऐका' तमाशापटात "बुगडी माझी सांडली गं.." या हिट गाण्यावर दिलखेच नृत्य करणाऱ्या जयश्री गडकरने प्रेक्षकांना जिंकले! मग एकीकडे 'अवघाची संसार' (१९६०) सारखे शहरी तर दुसरीकडे 'मोहित्यांची मंजुळा' (१९६३) सारखे ऐतिहासिक नि 'एक गाव बारा भानगडी' (१९६८) सारखे ग्रामीण व 'महासती सावित्री' (१९७३) सारखे पौराणिक..असे यशस्वी चित्रपट करीत ती आघाडीची अभिनेत्री झाली!
![]() |
| 'साधी माणसं' (१९६५) मध्ये सूर्यकांत व जयश्री गडकर! |
या दरम्यान अनंत माने यांचा पं. महादेवशास्त्री जोशींच्या कथेवरील 'मानिनी' (१९६१) आणि बाबा..भालजी पेंढारकरांचा सूर्यकांत यांच्या बरोबरील 'साधी माणसं' (१९६५) ह्या दोन महत्वपूर्ण सामाजिक चित्रपटांतून जयश्री गडकर ने अभिनयाचा कस लावणाऱ्या व्यक्तिरेखा स्वाभाविकपणे साकारल्या..त्यांसाठी 'उत्कृष्ठ अभिनेत्री'चे पुरस्कारही तिला मिळाले!
![]() |
| 'सारंगा' (१९६१) या हिंदी चित्रपटात जयश्री गडकर! |
सुमारे २५० मराठी व हिंदी चित्रपटांतून
जयश्री गडकर यांनी कामे केली. पुढे
निर्मिती-दिग्दर्शनही केले.
'अशी मी जयश्री' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले!
त्यांच्या निर्मितीतील चित्रपटाच्या प्रीमिअर वेळी झालेली अनौपचारीक चर्चा आठवते.. आणि त्यातून त्यांनी 'मानिनी'ची वास्तवातही कायम ठेवलेली प्रतिमाही!
अभिवादन!!
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी')
Saturday, 16 February 2019
हमारी याद आएंगी..!
![]() |
| तडफदार अभिनेता रमेश भाटकर! |
![]() |
| 'अश्रुंची झाली फुले' या गाजलेल्या नाटकात प्रभाकर पणशीकरांबरोबर रमेश भाटकर! |
![]() |
| 'हृदयस्पर्शी' चित्रपटात निशिगंधा वाड आणि रमेश भाटकर! |
करी सलाम' व 'आपली माणसं' सारख्या चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या. कालांतराने (अलका कुबल बरोबरील) 'युगंधरा' आणि 'कमांडर', 'हॅलो इन्स्पेक्टर' सारख्या मालिकांतून त्याने
छोट्या पडद्यावर उत्तम भूमिका केल्या!
सुमारे ९० (मराठी-हिंदी सह) चित्रपटांतून रमेश भाटकर यांनी काम केले. अखेरच्या काळात त्यास काही संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार घेताना पाहताना कसेसच झाले होते; कारण असा ज्येष्ठत्वाचा लवलेशही त्याच्याकड़े नव्हता..हे त्याच्या बरोबर मराठी चित्रपटांच्या पार्टीत बसलेल्या आम्हा सिने पत्रकारांनी अनुभवलेय. रुबाबात धुंदित वावरणारे ते कलासक्त नि रसिक व्यक्तिमत्व होते!
![]() |
वडिल प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांसमवेत
अभिनेता-पुत्र रमेश भाटकर!
|
एकदा मैफलित..त्याचे वडिल (दिवंगत) प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकारांच्या अभिजात गीतांचा विषय निघाला..तेंव्हा मी 'फ़रियाद' (१९६४) मधले "वो देखो देख रहा था पपीहा.." सारखी गाणी खुद्द त्याच्या वडिलांकडून अनौपचारिक भेटीत ऐकल्याचे' सांगताच तो भारावला होता!
'जागतिक कर्करोग दिनी' त्याच आजाराने त्यास हे जग सोडावे लागणे ह्यास काय म्हणावे?
अशा प्रसंगी एका मैफलित त्याने ऐकवलेले स्नेहल भाटकरांचेच अजरामर गीत आठवते...
"कभी तनहाइयों में यूँ हमारी याद आएगी..."
त्यांस भावांजली!!!
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी')
मराठी पाऊल पडते कुठे.?
मागच्या वर्षी..'९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'चे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी वर पाहत होतो आणि त्यात व्यासपीठा मागे बाराखडी लिहिलेली पाहून वैषम्य वाटले!..म्हणजे पुन्हा मूळाक्षरांपर्यंत भाषा आलीये का?
(अर्थात बडोद्यात याची दखल कोणी घेतली असेल!)
तेंव्हाच मागे पुण्यात झालेल्या '७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'ची आठवण झाली..
त्यावेळी व्यासपीठामागे '७५ वे अमृत महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन' असे लिहिलेले होते..
त्यावर तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनीही 'अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ वे असे लिहावे लागते का?' असे उपहासात्मक भाष्य केले होते!
मराठी अस्मितावाल्यांनी गंभीरपणे विचार करावा!!
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)
Monday, 4 February 2019
चित्रपटविषयक साहित्य उपेक्षितच!
'९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच पार पडले! मात्र एक खंत व्यक्त करावीशी वाटते की..चित्रपट विषयक साहित्यास अद्यापही साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर कधी स्थान मिळालेले नाही..किंबहुना ते अभिजात साहित्यात गणले जात नाही!
याबाबत पूर्वीपासून (गदिमांसारख्यांकडूनही) नाराजी व्यक्त होत आली आहे. वास्तविक पाहता किती तरी (वि.स. खांडेकर, पु.भा. भावे, साने गुरुजी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे ते आनंद यादव सारख्यांचे) अभिजात साहित्य हे मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आले आहे..आणि काही साहित्यिकांचे साहित्य (पुस्तक, कादंबरी) हे त्यावरील चित्रपट लोकप्रिय झाल्यावर जास्त वाचले गेले आहे.
लिखित साहित्य लोकप्रिय करण्यात चित्रपट माध्यमाचे योगदान हे केवळ मराठी पुरतेच मर्यादित नाही; तर अन्य प्रादेशिक व परदेशी भाषांतील साहित्याबाबतही हे होत आले आहे..यांत प्रेमचंदजींचे हिंदी 'गोदान', शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे बंगाली 'देवदास' ते मार्गारेट मिशेल यांचे इंग्लिश 'गॉन विथ द विंड', गुस्तोव्ह फ्लुबर्ट यांचे फ्रेंच 'मादाम बोव्हारी' व लिओ टोलस्टोय यांचे रशियन 'ऍना कॅरेनिना' सारखे अभिजात साहित्य उदाहरणादाखल देता येईल!
या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी 'साहित्य ते चित्रपट' सारख्या परिसंवादासारखे काही कार्यक्रम, याबाबतची समीक्षा व लेखन याबाबतचे विचारमंथन आगामी काळात होणे अपेक्षित आहे...तूर्त शुभेच्छा!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 3 February 2019
बहुचर्चित नि वादाचे '९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' नुकतेच आटोपले!
या पार्श्वभूमीवर ३० वर्षांपूर्वीचा आठवलेला हा वेगळा क्षण..
एके काळी (चित्रपट पत्रकारितेबरोबरच) औद्योगिक नियतकालिकाचा सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन (१९९७) संमेलनाध्यक्ष श्रीमान ना. स. इनामदार यांच्या हस्ते 'गदिमा पुरस्कारा'ने माझा सत्कार झाला होता!..ते हे छायाचित्र!!
- मनोज कुलकर्णी
या पार्श्वभूमीवर ३० वर्षांपूर्वीचा आठवलेला हा वेगळा क्षण..
एके काळी (चित्रपट पत्रकारितेबरोबरच) औद्योगिक नियतकालिकाचा सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन (१९९७) संमेलनाध्यक्ष श्रीमान ना. स. इनामदार यांच्या हस्ते 'गदिमा पुरस्कारा'ने माझा सत्कार झाला होता!..ते हे छायाचित्र!!
- मनोज कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)






















