मराठी पाऊल पडते कुठे.?
मागच्या वर्षी..'९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'चे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी वर पाहत होतो आणि त्यात व्यासपीठा मागे बाराखडी लिहिलेली पाहून वैषम्य वाटले!..म्हणजे पुन्हा मूळाक्षरांपर्यंत भाषा आलीये का?
(अर्थात बडोद्यात याची दखल कोणी घेतली असेल!)
तेंव्हाच मागे पुण्यात झालेल्या '७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलना'ची आठवण झाली..
त्यावेळी व्यासपीठामागे '७५ वे अमृत महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन' असे लिहिलेले होते..
त्यावर तत्कालिन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनीही 'अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ वे असे लिहावे लागते का?' असे उपहासात्मक भाष्य केले होते!
मराठी अस्मितावाल्यांनी गंभीरपणे विचार करावा!!
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)
- मनोज कुलकर्णी
('चित्रसृष्टी', पुणे)
No comments:
Post a Comment