फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
स्वये मनात जागते, न सूर-ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके कसे, कुठे, उद्या असू ?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे!"
..असे लिहिणाऱ्या कवयित्री-गीतकार शांताबाई शेळके यांस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
- मनोज कुलकर्णी
No comments:
Post a Comment