ह्या कठीण दिवसांत हे आल्हाददायक!
आमच्या बंगल्यात बहरलेले नारळ आणि आंबा हे वृक्ष! |
सध्याच्या उदास वातावरणात मन प्रसन्न करण्यासाठी आता केवळ आपल्या घरापासचा परिसरच!
कोरेगांव पार्क येथील आमच्या बंगल्यात नारळ आणि आंबा ह्या वृक्षां- पाशी उभे राहिले की हलणाऱ्या पानांतून येणारी वाऱ्याची झुळूक आल्हाद- दायी वाटते! त्यांवर बसणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट.. आणि कोकिळीची "कुहूs" हे ऐकू आले की रोमांचकच! मग हे वृक्ष सावली बरोबरच त्यांची फळे ही आपल्यापुढे सादर करतांत, तेंव्हा त्यांचं निर्मळ, निर्व्याज प्रेम हेलावून जातं!
मग रोज मिळणाऱ्या ह्या घरच्या नारळाचे (पाणी आदी) व कैरी-आंब्याचे (पन्हे, आमरस आदी) आस्वाद घेणे हे (बाजारा तून आणलेल्यांपेक्षा).. लज्जतदारच!!
- मनोज कुलकर्णी
No comments:
Post a Comment