Monday 17 September 2018

अमृतमहोत्सवी कवि-गीतकार महानोर!


निसर्गकवी ना. धो. महानोर
"गडद जांभळं भरलं आभाळ...
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ..!"
महानोरांचे 'रानातल्या कविता'!

अमृतमहोत्सवी निसर्गकवी ना.धो. महानोर यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला! एका पावसाळी संध्याकाळी त्यांनी सादर केलेली ही कविता आठवते आणि मन त्या गंधानं धुंद होतं!

'रानातल्या कविता', 'गावातल्या गोष्टी' नि 'पक्ष्यांचे लक्ष थवे' सारखे त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.

'जैत रे जैत' (१९७७) चित्रपटातील गीतात स्मिता पाटील!
"चिंब पावसानं रान झालं आबादानी.." सारखी त्यांची चित्रपटगीतेही तो मराठी मातीचा लहेजा घेऊन आली...अगदी "राजसा जवळी जरा बसा.." सारखी बैठकीची लावणी सुद्धा!

यात विशेषत्वानं आठवतं ते डॉ. जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) या चित्रपटात स्मिता पाटीलनं अप्रतिम साकार केलेलं..
'पिफ्फ' मधील सत्कारानंतर महानोरांसमवेत मी!

 "नभ उतरू आलं..चिंब थरथर वल्ल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात!'

'अजिंठा' या त्यांच्या खंड्काव्यावर प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटही केला!

'साहित्य अकादमी' ते 'पद्मश्री' असे मानाचे पुरस्कार त्यांना लाभले आणि मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही झाले!

'पिफ्फ' पुरस्कार सोहळ्यातही महानोरांची चांगली भेट झाली होती!

त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!


- मनोज कुलकर्णी 
[' चित्रसृष्टी', पुणे]

No comments:

Post a Comment