Monday 7 January 2019

कसली भाषिक अस्मिता..नि कुठेय अभिव्यक्ती?


ज्येष्ठ लेखिका श्रीमती नयनतारा सहगल!
ख्यातनाम लेखिका श्रीमती नयनतारा सहगल यां आगामी '९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे करणार असणारे उद्घाटन अचानक रद्द झाल्याचे कळल्यावर खेद वाटला!

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास अमराठी साहित्यिकांस नापसंती दर्शविणे ही कसली भाषिक अस्मिता? तसेच त्यांचे परखड भाषण गैरसोईचे होईल असे आयोजकांस वाटणे हे अभिव्यक्ति स्वातंत्र्यास तिलांजली देण्यासारखेच!

श्रीमती सहगल या आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भाच्ची असून, इंग्रजीमध्ये त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये त्यांनी वाढत्या असहिष्णुते मुळे तसेच सांस्कृतिक विविधता जपण्याच्या चिंतेतून आपला 'साहित्य अकादमी पुरस्कार' परत केला होता!..ही पार्श्वभूमी इथे लक्षात घ्यावी!

तर ही कसली भाषिक अस्मिता जी दुसऱ्या भाषांचा अनादर करते?..आणि कुठे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य परखडपणे व्यक्त होण्याचे?

अशा गोष्टींचा निषेध!..आशा आहे हे वातावरण बदलेल!!

- मनोज कुलकर्णी
  ['चित्रसृष्टी']

No comments:

Post a Comment