माझ्या या ब्लॉग वर मी चित्रपट सृष्टीतील घडामोडी तसेच संबंधित कला-साहित्य विश्वावर मराठीत लिहिलेले असेल! यांत लेख, समीक्षा व मुलाखती आदींचा समावेश असेल! मनोज कुलकर्णी (पुणे)
Thursday, 24 August 2023
"भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी..."
हे तितक्याच भावोत्कटपणे पडद्यावर साकार करणाऱ्या, अभिजात मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखदायीच!
रमेश देव-सीमा देव या दिग्गज कलाकार दांपत्याशी झालेली भेट आज आठवते!!
त्यांस सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 6 August 2023
![]() |
| निसर्गकवी ना. धो. महानोर. |
प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचे निधन झाल्यावर त्यांचे हे काव्य त्यांच्याच आवाजात मनात रुंजी घालू लागले..आणि मन सुन्न झाले!
'रानातल्या कविता', 'गावातल्या गोष्टी', 'पक्ष्यांचे लक्ष थवे' असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
"चिंब पावसानं रान झालं आबादानी.." सारखी त्यांची चित्रपटगीतेही तो मराठी मातीचा गंध घेऊन आली!
विशेषत्वानं आठवतं ते जब्बार पटेल यांच्या 'जैत रे जैत' (१९७७) चित्रपटात स्मिता पाटीलने अप्रतिम साकार केलेलं..
"नभ उतरू आलं..चिंब थरथर वल्ल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात!'
'अजिंठा' या त्यांच्या खंड्काव्यावर प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटही केला!..तेही नुकतेच हे जग सोडून गेले!
'साहित्य अकादमी' ते 'पद्मश्री' असे मानाचे पुरस्कार महानोर यांना लाभले! 'मराठी साहित्य संमेलना'चे ते अध्यक्षही झाले!
त्यांच्या काव्यवाचनाच्या वेळी त्यांची झालेली भेट आठवते!!
त्यांना भावपूर्ण पुष्पांजली!!
- मनोज कुलकर्णी
Wednesday, 2 August 2023
Thursday, 6 July 2023
Friday, 9 June 2023
![]() |
| संगीत आणि अभिनय क्षेत्रांतील आदरणीय..लता मंगेशकर आणि सुलोचनाबाई! |
"गडनी, सजनी..
गडनी सजनी गं.."
भालजी पेंढारकरांच्या 'साधी माणसं' (१९६५) मधील हे नणंद-भावजय यांच्या ऋणानुबंधांचं गाणं!..या ग्रामीण चित्रपटांत जयश्री गडकर यांच्याबरोबर ही "मायेची वयनी" साकार केली होती..अर्थात सुलोचनाबाईंनी!
भालजींचेच ('योगेश' नावाने) हे गीत लता मंगेशकर यांनी स्वतःच्याच ('आनंदघन') संगीतांत भावोत्कटतेनं गायलेय!
सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी, चित्रपटसृष्टीत एकाच ठिकाणी लता दीदीं पाठोपाठच कारकीर्द सुरु झालेल्या सुलोचना दीदी यांचे त्यांच्याशी स्नेहबंध जुळले ते कायमचेच! आता हा दैवयोग म्हणावा की काय, मागच्या वर्षी लताजी हे जग सोडून गेल्या आणि पाठोपाठ या वर्षी सुलोचनाजी ही गेल्या!
संगीत आणि अभिनय क्षेत्रांतील आपल्या ह्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांचे असे आपल्याला सोडून जाणे हे काहीसे वरील गीतातील "आसवांची गंगा वाहते.." शब्दांप्रमाणेच भावुक करणारे!
माझे भाग्य की मला वंदनीय असणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे (माझ्या 'चित्रसृष्टी' संदर्भात) मला जिव्हाळापूर्ण कौतुक लाभले!!
त्यांना माझी नम्र सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Sunday, 14 May 2023
"देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे..
जीवन देई मम बाळाला.!"
मातेचे असे उत्कट भाव पडद्यावर व्यक्त झाले होते वात्सल्यमूर्ती सुलोचनाबाई यांच्या रूपात!
भावकवी पी. सावळाराम यांचे हे हृदयस्पर्शी गीत वसंत देसाई यांच्या संगीतात गायले होते आशा भोसलेंनी!
साने गुरुजी यांच्या हळव्या लेखणीतून आलेल्या कथेवरील हा चित्रपट होता यशवंत पेठकर यांचा 'मोलकरीण' (१९६३). साठ वर्षें होऊन गेली यास...पण मराठी रुपेरी पडद्यावरील मातृवात्सल्य आठवताना हेच भावुक गीतदृश्य समोर येते!
फार पूर्वी रेडिओवर माझ्या संहितेवर मी सादर केलेल्या मातृविषयक कार्यक्रमात हे गाणे प्रथम होते!
कालांतराने माझ्या 'चित्रसृष्टी' विशेषांकासाठी आदरणीय सुलोचनाबाईची मी घेतलेली मुलाखत अविस्मरणीयच!!
या मातृदिनी शुभेच्छा!!!
- मनोज कुलकर्णी
Friday, 12 May 2023
Sunday, 30 April 2023
Saturday, 22 April 2023
Wednesday, 29 March 2023
Monday, 6 February 2023
भाग्यशाली मी!
गान सरस्वती यांच्या दरबारात..
जीवनातील असा हा सोनेरी क्षण!
आपलेपणाने झालेली सुरीली बात,
जीवन संगीताने भारावलेला क्षण!
- मनोज 'मानस रूमानी'
(माझा 'चित्रसृष्टी' संगीत विशेषांक स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर जी यांना दाखवल्यावर कौतुकाने त्या पाहतानाचा सोनेरी क्षण आठवत...त्यांस प्रथम स्मृतिदिनी माझी ही विनम्र सुमनांजली!)
- मनोज कुलकर्णी
Friday, 3 February 2023
रौप्यमहोत्सवी..सत्कार क्षण!
'९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर आठवलेला हा क्षण!
एके काळी (चित्रपट पत्रकारितेबरोबरच) औद्योगिक नियतकालिकाचा सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असताना तत्कालिन (१९९७) संमेलनाध्यक्ष श्री. ना. स. इनामदार यांच्या हस्ते 'गदिमा' पुरस्काराने माझा सत्कार झाला होता!
यास पंचवीस वर्षे होऊन गेली!!
- मनोज कुलकर्णी
Wednesday, 11 January 2023
खांडेकर..जीवनवादी साहित्यिक!
'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त पहिले मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांची आज १२५ वी जयंती!
'अमृतवेल' आणि बहुसन्मानित 'ययाति' सारख्या त्यांच्या साहित्यकृतीं जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देतात.
मराठी, तेलुगु, तामिळ आणि हिंदी चित्रपट त्यांच्या साहित्यांवर निर्मिले गेले. त्यांत 'छाया' (१९३६), ज्वाला' (१९३८), 'देवता' (१९३९), 'अमृत', 'धर्मपत्नी' (१९४१) आणि 'परदेशी' (१९५३) यांचा समावेश होतों.
'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अध्यक्ष आणि 'साहित्य अकादमी पुरस्कार' व 'पद्मभूषण' ने खांडेकर गौरविले गेले!
त्यांना विनम्र सुमनांजली!!
- मनोज कुलकर्णी
Monday, 2 January 2023
चित्रपट संस्कृती रुजवण्याचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व!
![]() |
| ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर! |
'प्रभात चित्र मंडळा'चे संस्थापक आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक.. सुधीर नांदगावकर यांचे निधन झाल्याने चित्रपटाशी समर्पित दुवा अखेर निखळला!
त्यांच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी माझा परिचय झाला तो आपल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' ('इफ्फी') मुळे! आम्ही चित्रपट विषयक अभ्यास पूर्ण लिखाण करणारे असल्याने स्नेह वृद्धिंगत झाला! चित्रपट माध्यमाचा यथायोग्य प्रसार होण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या 'प्रभात चित्र मंडळा'चे कार्यही मी अनुभवले. फिल्म सोसायटी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते!
त्यांच्या 'प्रभात' द्वारे निघणाऱ्या 'रूपवाणी' साठी मी लिहावे असा त्यांचा आग्रह होता; पण ते राहून गेले! २००२ मध्ये मी सुरु केलेल्या 'चित्रसृष्टी' या संपूर्ण जागतिक चित्रपटावर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या विशेषांकाचे त्यांना अप्रूप वाटले आणि याच्या प्रकाशन समारंभापूर्वी फोन करून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या! पुढे त्यामधून 'समांतर सिनेमा ची वाटचाल' वर त्यांनी लेख ही लिहिला.
'मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज' ('मामी') द्वारे 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल' सुरु करण्यात त्यांचाच पुढाकार होता! हा विचार तसा 'इफ्फी' च्या आयोजन स्थळाच्या अनुषंगाने पुढे आल्याचे मला स्मरते! १९९५ मध्ये 'इफ्फी' मुंबईत झाला, तेंव्हाच आपली चित्रपटसृष्टी असलेल्या याच महानगरात पुढेही तो राहावा असे बहुदा त्यांना वाटत होते! १९९६ मध्ये दिल्लीत झालेल्या 'इफ्फी' मध्ये त्यांच्या या चर्चेने जोर धरला. नंतर "मुंबईतच आपला वेगळा चित्रपट महोत्सव असेल" हे त्यांचे बोल तिथे मी ऐकले! आणि त्याच्या पुढच्याच वर्षी १९९७ मध्ये त्यांच्या संकल्पनेतून या 'मामी'च्या 'मुंबई फिल्म फेस्टिव्हल' ची मुहूर्तमेढ रोवली गेली! त्यांनंतर 'आशियाई चित्रपट महोत्सव'ही मुंबईत भरू लागला. सुरुवातीची काही वर्षे मी ह्या चित्रपट महोत्सवांस उपस्थित राहिलोही!
कालांतराने सोशल मीडिया म्हणजेच 'फेसबुक' वरील माझे जागतिक चित्रपटावरील लिखाण ते वाखाणीत असत. यांत कधी 'मुग़ल-ए-आज़म' चित्रपटावर दुर्मिळ छायाचित्रांसह केलेले माझे लेखन आवडून "मनोज, तुझा हा उपक्रम उत्तम आहे" अशी टिप्पणी करून केलेली प्रशंसा असे; तर कधी चित्रपट दिग्दर्शक राज खोसला यांच्यावरील लेखाला दिलेली दाद! 'ते म्हणजे समांतर सिनेमा' असे बऱ्याच जणांना वाटे; पण त्यांना त्या व्यतिरिक्त अभिजात चित्रपटांतही रुची होती. गुरुदत्त हा अभिनेता-चित्रकर्ता आमच्या दोघांचाही जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांना त्याचा 'कागज़ के फूल' सर्वोत्तम वाटे, तर मला (कवी मनाचा असल्याने) 'प्यासा' श्रेष्ठ! तसा त्यांना काव्य-शायरी मध्येही रस होता हे त्यांनी फेसबुक वरील माझे असे लिखाणही नेहमीच लाईक केल्याचे पाहता निदर्शनास आले!
अलिकडे काही वर्षापूर्वी चित्रपट विषयक संदर्भ-माहिती विचारण्यासाठी त्यांचा फोन येत असे. (इतक्या ज्येष्ठांनी आपल्याला असे विचारावे हे मला अचंबित करे, पण चित्रपट इतिहासावरील माझ्या अभ्यासावरचा त्यांचा विश्वास यातून जाणवे! शेवटचा फोन 'प्रख्यात चित्रकर्ते केदार शर्मांबाबत माहिती'साठी आला होता! त्यानंतर काही संपर्क नव्हता!
त्यांस माझी ही भावांजली!!
- मनोज कुलकर्णी












